सत्तेसाठी भाजप नेते विभाजनाचे राजकारण करत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. राजकारणात यश मिळवण्यासाठी हिंसाचार घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप सोनियांनी येथील जाहीर सभेत केला.
केवळ सत्ता मिळवणे हेच भाजपचे ध्येय असल्याचा आरोप करताना नरेंद्र मोदींवरही त्यांनी टीका केली. स्वत:चे कौतुक करण्यात मग्न असणाऱ्यांनी देशासाठी त्यांची विचारसरणी योग्य आहे काय याचा विचार जनतेने करावा, असे आवाहन केले. अशा लोकांचे हेतू लक्षात घ्या, असा इशाराही सोनियांनी दिला. काँग्रेसला सत्तेची नव्हे तर देशाची चिंता आहे.