Budget 2019 मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा शेतकरी मध्यमवर्गीय आणि कामगारांना बंपर लॉटरी देणारा ठरला आहे. कारण पियूष गोयल यांनी शेतकरी, मध्यमवर्गीय आणि कामगारांना मोठा दिलासा देण्याचं काम केलं आहे. पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत मोदी सरकारने मध्यमवर्गींयांना दिलासा दिला आहे. पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही करत आता नसणार आहे. पियूष गोयल यांनी ही घोषणा करताच सगळ्यांनी मोदी मोदी मोदी घोषणा दिल्या. करप्रणालीमध्ये सरकार काय बदल करणार याकडे देशाच लक्ष लागून राहिलं होतं. त्या अपेक्षेनुसार सर्वात मोठा दिलासा मोदी सरकारने मध्यमवर्गीयांना दिला आहे. शेत मजुरांसह असंघटीत कामगारांसाठी पियूष गोयल यांनी पेन्शन योजना आणली आहे. 21 हजारांपेक्षा पगार असलेल्या तीन हजार रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. यासाठी त्यांना प्रतिमहिना 100 रुपये गुंतवावे लागणार आहे. 60 वर्षानंतर तीन हजार पेन्शन दिली जाणार आहे. देशभरातल्या 10 कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा केले जाणार आहेत. तर पाच एकरांपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना प्रति महिना 500 रुपये दिले जाणार आहेत. पियूष गोयल यांनी ही घोषणा अर्थसंकल्पात केली आहे.