भाजप प्रदेशाध्यक्षांचा ‘तृणमूल’ला इशारा
भाजप कार्यकर्ते संघातून प्रशिक्षित असतात त्यामुळे तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे खांद्यातून हात निखळण्याची ताकद आमच्यात आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले आहे. तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार थांबवला नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांची मुले निराधार होतील असे वक्तव्यही केले. निवडणूक निकालानंतर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार थांबवावा अन्यथा बंगाल बाहेर केल्यावर त्यांना परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी खरगपूर येथील सभेत दिला. तृणमुल काँग्रेसकडे २११ आमदार आहेत. आमचे देशभरात एक हजारावर आमदार व खासदार आहेत हे ध्यानात ठेवावे. आम्हाला चिथावणी देऊ नका त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.