नामांतरानंतर देशातील शहरे जर प्रगती करणार असतील तर देशातील १२५ कोटी भारतीयांचे नामकरण ‘राम’ असे करावे, असा टोला हार्दिक पटेल यांनी लगावला आहे. या देशात बेरोजगारी, शेतकरी आदी समस्या असतानाच ही लोक नामकरण आणि मूर्ती- स्मारकांमध्ये अडकली आहेत, असे सांगत त्यांनी भाजपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल हे बुधवारी उत्तर प्रदेशमधील संभल येथे एका कार्यक्रमात उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपावर टीका केली. हार्दिक पटेल म्हणाले, शत्रूंशी लढण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. जर आपण एकत्र आलो नाही तर त्यांची बाजू आणखी भक्कम होईल. केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशमधून जातो, असे सांगितले जाते. उत्तर प्रदेशमध्ये बेरोजगारीची समस्या आहे. रोजगाराअभावी तरुणांना दुसरीकडे फिरावं लागतंय. आम्ही यावर तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा राम मंदिराचा मुद्दा आहे. या आधारे हिंदू मते मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
Agar iss desh mein sirf shehron ke naam badlne se desh ko sone ki chidiya bana sakte toh main maanta hun ki 125 crore Hindustaniyon ka naam Ram rakh dena chahiye. Iss desh mein berozgari,kisanon ka prashn bada hai aur yeh naam aur murtiyon ke chakkar mein hain:Hardik Patel(14.11) pic.twitter.com/UFUjcKSodN
— ANI (@ANI) November 15, 2018
सीबीआय, राफेल, आरबीआय या मुद्द्यांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा पुढे आणला जातो. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील वातावरण खराब करत आहे. नामकरणामुळे देशातील शहरे ‘सोने की चिड़िया’ होणार असतील तर १२५ कोटी भारतीयांचे नाव राम ठेवावे, असा टोला त्यांनी लगावला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 15, 2018 11:08 am