भारतमाता की जय म्हणणे, संस्कृतबद्दल बोलणे आणि गोमांस न खाणे या बाबींवरून आता भारतात व्यक्तीची ओळख ठरविण्यात येत असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले आहे. काही जण जबरदस्तीने भारतमाता की जय घोषणा देतात, तर काही जण मनापासून घोषणा देतात. जेव्हा भारतमाता की जय म्हणण्यास सांगण्यात येते तेव्हा तशी घोषणा जे देत नाहीत त्यांना आम्ही विशेष समजतो तर उर्वरित लोकांना आम्ही सर्वसमावेशक समाजतो, असे सिसोदिया म्हणाले. ‘मेकिंग दिल्ली अॅन इन्क्ल्युझिव्ह सिटी’ या चर्चासत्रात ते बोलत होते.