‘क्राय’ या सामाजिक संस्थेने देशातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार भारतातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील सुमारे २.३ कोटी मुले बालकामगार आहेत आणि त्यापैकी १९ दशलक्ष मुलांनी शिक्षणही सोडून दिले आहे.

क्रायच्या अहवालानुसार १५ ते १९ वर्षे वयोगटातील ९.२ दशलक्ष मुलांचे विवाह झाले आहे तर याच वयोगटातील २.५ दशलक्ष मुली माता झाल्या आहेत. देशातील २३ दशलक्ष बालकामगारांपैकी १९ दशलक्ष मुलांवर शिक्षण आणि नोकरी यांचा ताळमेळ न साधता आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. शिक्षण सोडण्याचे प्रमाण पाहता शिक्षणाच्या धोरणामध्ये बदल करण्याची गरज असून दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबातील मुलांना माध्यमिक शिक्षणही मोफत देण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

11 students dead in various incidents in us in 2024 mysterious deaths of Indian students in us
‘अमेरिकन ड्रीम’ दु:स्वप्न का ठरत आहे?
Centers for training of medical teachers are insufficient in the state
राज्यात वैद्यकीय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी केंद्र अपुरे; वैद्यकीय शिक्षक संघटना म्हणते…
Palghar, teachers election training,
पालघर : निवडणूक प्रशिक्षणाकरिता शिक्षकांची तारांबळ, मुल्यांकन चाचणी व निवडणूक प्रशिक्षण एकाच वेळेत
education opportunity in iiser students unique educational experience iiser
शिक्षणाची संधी : आयसरमधील संधी

गेल्या वर्षी देशात लहान मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले आणि अपहरण झालेल्या मुलींपैकी ६० टक्के मुली १५ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत, तर २५ टक्के बलात्काराच्या घटनांमधील पीडित या वयोगटातील आहेत. सदर दोन्ही समस्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे अहवालात म्हटले आहे.