नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर ईशान्येत झालेला उद्रेक हळूहळू देशभर पसरू लागला आहे. रविवारी राजधानी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलक विद्यार्थी आणि पोलीस आमनेसामने आले. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद सोमवारी देशभरात उमटू लागले आहेत. आयआयटी मुंबईसह देशातील अनेक शैक्षणिक संस्थामधून कायद्याला विरोध होऊ लागला आहे. लखनऊतील नदवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निदर्शनं सुरू केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर दगडफेक झाली.