रविंद्रनाथ टागोर लिखित ‘जन गन मन…’ या भारताच्या राष्ट्रगीतातील ‘सिंध’ हा शब्द वगळून त्याऐवजी ‘ईशान्य भारता’चा राष्ट्रगीतातील ‘सिंध’ शब्द हटवून ‘ईशान्य भारता’चा उल्लेख करा; काँग्रेस खासदाराची मागणीसमावेश करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे खासदार रिपुन बोरा यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी खासगी प्रतिनिधी ठराव शुक्रवारी राज्यसभेत मांडला.


राष्ट्रगीतात बदल करण्याबाबत बोरा यांनी राज्यसभेत मांडलेल्या या ठरावात तीन बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, स्वातंत्र्यापूर्वी रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या ‘जन गण मन…’ या काव्याला स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली. स्वातंत्र्यापूर्वी भारताचा भाग असणाऱ्या ‘सिंध’ प्रांताचा यात उल्लेख करण्यात आला होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर हा भाग पाकिस्तानात गेला असून तो आता भारताचा भाग राहिलेला नाही. तर, ईशान्येकडील सात राज्ये ही भारताचा महत्वाचा भाग आहेत. या राज्यांसंदर्भात राष्ट्रगीतात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ‘सिंध’ हा शब्द हटवून त्याऐवजी ईशान्य भारतासंबंधी उल्लेख राष्ट्रगीतात करण्यात यावा.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेत बोलताना सांगितले होते की, ‘जन गण मन’ या गीताची शब्दरचना आणि संगीताला भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात येत आहे. तसेच भविष्यात यातील शब्दांमध्ये बदल करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारला त्याचे अधिकार असतील.

त्यामुळे डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या या भाषणाचा दाखला देताना हे सभागृ राष्ट्रगीत आवश्यक बदल करेल अशी आम्हाला आशा आहे, असे रिपुन बोरा यांनी म्हटले आहे.