पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी शनिवारी विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीची सुरुवात केली. राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि अन्य डाव्या पक्षांना माकपशी हातमिळवणी करण्याचे आवाहन करतानाच भट्टाचार्य यांनी औद्योगिकीकरण हा निवडणुकीतील मोठा प्रश्न असल्याचे सूचितकेले.