करोना साथरोगाचे आक्रमण परतवून लावण्यासाठी राज्य सरकार आणि सरकारच्या यंत्रणांनी आक्रमकपणे केलेल्या लढाईला यश येऊ लागले आहे. मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत घट दिसून येत असून पूर्ण बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण देशभरात करोना व्हायरसचे १३,५०० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. करोना व्हायरसमुळे देशात आतापर्यंत ४४९ जणांचा मृत्यू झाला आहे.