करोना विषाणूची लागण सरकारने नियंत्रणात ठेवली असल्याचा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे त्यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. प्रवाशांनी घाबरू नये, आपले जहाज बुडणारे नाही असा दिलासा देणाऱ्या टायटॅनिक जहाजाच्या कॅप्टनसारखा हर्षवर्धन यांचा दावा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारतामध्ये करोना विषाणूची लागण रोखण्यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखल्या आहेत, असे हर्षवर्धन यांनी संसदेत सांगितले त्यानंतर राहुल गांधी यांनी वरील ट्वीटद्वारे वरील मत व्यक्त केले आहे. या पेचप्रसंगावर मात करण्यासाठी सरकारने कृती योजना जाहीर करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.