गेल्या काही दिवसांपासून देशात एका विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे गंगेच्या पात्रात वाहून आलेल्या मृतदेहांची. हे मृतदेह कसे वाहून आले आणि या लोकांचा मृत्यू नेमका कशाने झाला? यासह विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चर्चा सुरू झाल्यानंतर माध्यमांनीही या मुद्द्यावर बोट ठेवलं. त्यामुळे प्रशासनाला कामाला लागावं लागलं. इंडियन एक्स्प्रेसनेही वाहून येत असलेल्या मृतदेहांच्या कारणांचा शोध घेतला. त्यामागील परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी अनेक धक्कादायक आणि विचार करायला लावणारी कारणं समोर आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्नाव आणि गाझीपूरमधील परिसरात मृतदेह आढळून आल्यानंतर तेथील स्थानिक रहिवाशी, मृतांचे नातेवाईक आणि अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर आली. पारंपरिक रुढी आणि करोनामुळे ओढवलेल्या आर्थिक संकट या वाहत येणाऱ्या मृतदेहामागे आहे. विशेष म्हणजे वाहून आलेल्या अनेक मृतदेहांपैकी अनेकांची सरकार दफ्तरी नोंदही झालेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 crisis in india unnao and ghazipur behind bodies found on river banks gahmar ghat overflowing cremation bmh
First published on: 15-05-2021 at 08:42 IST