लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मोहम्मद नावेद याकूब याने गर्दीच्या ठिकाणी हल्ले करण्याची आमची योजना होती, आम्ही प्रचंड घाबरलो होतो, मात्र अखेरच्या क्षणी निडर होत आम्ही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला, असे सांगितले. उधमपूरजवळ जवानांवर हल्ला करणाऱ्या याकूबला जिवंत पकडण्यात आले होते.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या कोठडीत असलेल्या याकूबची चौकशी करण्यात येत असून या वेळी त्याने वरील माहिती दिली. याकूबने चार सहकाऱ्यांसह जूनमध्ये भारतात प्रवेश केला होता. या चार दहशतवाद्यांमध्ये अबू ओकासा या १७ वर्षीय दहशतवाद्याचाही समावेश होता. पहिल्यांदा हल्ला करण्याची योजना आखल्यावर अबूने रडण्यास सुरुवात केल्यामुळे दहशवाद्यांनी मोहीम अर्धवट सोडून परतण्याचा निर्णय घेतला होता.