सिलिगुडी रुग्णालय तसेच उत्तर बंगाल वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नव्याने जन्माला आलेली १५ बालके दगावली आहेत, अशी माहिती डॉ. अमरेंद्रनाथ सरकार यांनी दिली. जन्मावेळी कमी वजन, संसर्ग व इतर कारणांनी या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. किमान १००-१५० बालकांना गंभीर अवस्थेत रोज या रुग्णालयात दाखल केले जाते असे त्यांनी सांगितले. उत्तर बंगालचे विकासमंत्री गौतम देव यांनी सांगितले, की बालकांच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.