भारतातून दारिद्र्याचे उच्चाटन होण्यास अजून बराच काळ लोटावा लागणार आहे. परंतु, उच्च आर्थिक वाढीमुळे देशात कोट्यधीशांच्या संख्येत हजारोने भर पडत आहे. कोट्यधीशांच्या संख्येत भारतात यंदा ७,३०० कोट्यधीश वाढले असल्याची माहिती समोर आली आहे.  क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार, २०१७-१८ मध्ये भारतामध्ये ७,३०० लोक मिलेनियर क्लबच्या यादीत सामिल झाले आहेत. या नव्या लोकांमुळे भारतामध्ये कोट्यधीशांची संख्या ३.४३ लाख झाली आहे. या करोडपतींच्या कुटूंबियांची एकूण संपत्ती ६ ट्रिलियन डॉलर्स अर्थात ४४१ लाख कोटी रुपये आहे. २०२० या वर्षापर्यंत देशातील करोडपतींची संख्या तब्बल ३,८२,००० वर पोहोचण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

देशातली गरीबी कमी झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे. देशातल्या करोडपतींची संख्या मात्र झपाट्याने वाढतच आहे. क्रेडिट स्विसच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. अहवालात म्हटले आहे की, भेलेही भारतात संपत्तीच्या प्रमाणात वाढ झाली असेल. पण, यात प्रत्येक भारतीयाचा हिस्सा नाही. देशातील नागरिकांकडे असलेली संपत्ती अद्यापही चिंतनाचा विषय आहे. अहवालातील आकडेवारीवरून दिसते की, सुमारे ९२ टक्के लोकांकडे १०,००० डॉलरपेक्षाही कमी संपत्ती आहे. तर, दुसऱ्या बाजूला संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांकडेच आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
Toronto airport cargo facility Heist
कॅनडामध्ये ‘मनी हाइस्ट’ प्रमाणे सर्वात मोठी चोरी; भारतीय वंशाच्या आरोपींनी ४०० किलो सोने पळविले
Antarctica Post Office
भारतीय टपाल विभागाने रचला इतिहास; अंटार्क्टिकामध्ये सुरु केले नवे पोस्ट ऑफिस
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी क्रेडिट सुएझने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०१८ च्या मध्यापर्यंत ३ लाख ४३ हजार कोट्यधीश होते. मागील वर्षी त्यांची संख्या ७,३०० ने वाढली. या नव्या कोट्यधीशांपैकी ३,४०० जणांकडे पाच-पाच कोटी डॉलर्स म्हणजेच ३६८-३६८ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे तर १५०० जणांकडे १० कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे ७३६-७३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

डॉलर्सच्या तुलनेत भारताच्या एकूण संपत्तीमध्ये २.६ टक्क्यांनी वाढल्यामुळे ६,००० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. २०२३ पर्यंत भारतात करोडपतींची संख्या आणि गरीब-श्रीमंत तफावतीत फरक पडेल. भारतातील श्रीमंती आणि गरीब यांच्यातील तफावत ५३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. २०२३ पर्यंत भारतातील कोट्याधीशांच्या संखेत मोठी वाढ होणार आहे. २०२३ मध्ये भारतामध्ये ५,२६,००० लोक कोट्याधीश होतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.