संसदेत प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती लागू करता येईल का, यावर चर्चा व्हावी. निवडणुकीत भाजपला ३१% मते मिळाली असून त्यांनी २८२ जागांवर, तर काँग्रेसला १९.३% मते असूनही ४४ जागांवर विजय मिळाला. अभाद्रमुक, माकप या दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ३.३  असून अभाद्रमुकला ३७, तर माकपला ९ जागा मिळाल्या. त्यामुळेचप्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीवर चर्चा व्हावी, असे एम. करुणानिधींनी म्हटले आहे.