डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम प्रशासक व संसदपटू होते. अधिकारी व कर्मचा-यांकडून उत्तम प्रकारे काम करुन घेण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. त्यांच्या कामाच्या झपाटलेपणामुळे कामगारांसाठी अनेक कायदे झाले. धोरणे झाली. जलऊर्जा धोरण झाले. भारतीय घटना झाली. या देशातील जनतेसाठी कल्याणासाठी कायदे झाले. प्रशासन कशे चालवावे. प्रशासनात कोणत्या अडचणी आहेत हे समजून घेत, त्यांच्यावर ज्या ज्या जबाबदा-या सोपवल्या त्यात त्यांनी कुशलतेने काम करुन दाखवले. प्रारंभी मुंबई विधिमंडळात व त्यानंतर संसदेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी ही अप्रतिम ठरली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन मुंबई विधिमंडळात आणि संसदेमध्ये जी मोलाची कामगिरी केली त्याची दखल राजकीय इतिहासकारांनी घेतली आहे. आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने सोशल मीडियावर त्यांच्या भाषणाचा ऑडिओ-व्हिडीओ ट्रेंड होत आहे. 'बाबासाहेब आंबेडकर यांचं संसदेतील भाषण' या नावाने हा ऑडिओ-व्हिडीओ समाज्माध्यमांमध्ये पसरत आहे. ते कसे अभ्यासू संसदपटू होते व उत्तम प्रशासक होते हे सांगणा-या त्या त्यांच्या तडफदार भाषणाची एक झलक - पाहा व्हिडीओ - (साभार-YouTube)