भारतातील लोकसभा निवडणूक ही जगातील एक सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया मानली जाते. निवडणूक आयोगाने त्याचे नियोजन किमान १८ महिने आधी केले होते.* मतदारांची संख्या- ८३.०५ कोटी* मतदान केंद्रे- ९ लाख* लोकसभा मतदारसंघ -५४३* निवडणूक कर्मचारी ६, ६९, ०००* मतदारसंघनिहाय हेल्पलाइन* जप्त केलेले पैसे- ३१३ कोटी रु.* जप्त केलेली दारू -२.२ लाख लिटर (किंमत १ हजार कोटी)* जप्त केलेले अमली पदार्थ- १.८ लाख किलो.* प्रथमच खर्च निरीक्षण विभाग सुरू* एसव्हीईईपी (स्वीप) या मतदार जागरुकता कार्यक्रमाची अंमलबजावणी* मतदार जागरुकता मोहिमेत सहभागी मान्यवर- ए. पी. जे. अब्दुल कलाम, आमीर खान* महिला मतदारसंख्या- ५५ टक्क्य़ांवरून ६५ टक्क्य़ांवर’शहरी मतदारसंख्येतील वाढ- १३ टक्क्य़ांवरून २० टक्के.* विक्रम- मतदार नोंदणीसार्ठी एका दिवशी ८२ लाख अर्ज.* एफआयआरची संख्या- १६,०००* पेड न्यूज नोटिसा -३००० (प्रत्येक दिवशी पेड न्यूजची पन्नास प्रकरणे)* भरारी पथके- ४० पथके (सदस्य संख्या २१,०००)* खर्च निरीक्षक संख्या-६६७* मतदान कामासाठी हेलिकॉप्टर्सची संख्या-५० (उड्डाणे- १५००)* रेल्वेचा वापर- ५७० खास गाडय़ा निवडणूक कामासाठी.* निवडणूक बंदोबस्तासाठी निमलष्करी दलाच्या जवानांची संख्या- ८ लाख.* नऊ टप्प्यात निवडणूक घेण्याचे कारण- सुरक्षा दले कमी काळात हलवणे शक्य नव्हते.* मतदानाचे वैशिष्टय़- देशाच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे ६६.४ टक्के मतदान (१९८४- ६४ टक्के मतदान)* निवडणुकीचा खर्च- ३४२६ कोटी (२००९- १४८३ कोटी)