पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या २०१४ -१९ या पाच वर्षांच्या कार्यकाळात ९६३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर ४१३ जवान शहीद झाले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी लोकसभेत दिली.

लोकसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरंक्षण मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की , २०१४ मध्ये १०४,  २०१५ – ९७,  २०१६ – १४०, २०१७ – २१० तर २०१८ मध्ये २४९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. जम्मू – काश्मीरमधील पुलवामात सीआरपीएफच्या पथकावर हल्ल्यानंतर लष्कराकडून दहशतवादविरोधी कारवाई अधिक जलद व कठोर करण्यात आली आहे. काश्मीर घाटीला दहशतवाद मुक्त करण्यासाठी सतत करावायाकरून दहशतावाद्यांचा खात्मा केला जात आहे.