दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींपैकी पहिली महत्वाची बातमी आहे गुलजार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या सारखे विचारवंत खुलेपणे समाजातील प्रथांबद्दल बोलले म्हणून मारले गेले असे मत गुलजार यांनी व्यक्त केले आहे. दुसरी महत्वाची बातमी आहे दिल्लीमधील. आधी धर्म बदला मग पासपोर्ट मिळेल असा विचित्र सल्ला पासपोर्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. तिसरी महत्वाची बातमी आहे ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केलेल्या टिकेसंदर्भातील आहे. भाजप हा दशतवादी पक्ष असल्याची टिका ममता बॅनर्जींनी केली आहे. या महत्वाच्या बातम्यांबरोबरच देश-विदेश, मनोरंजन आदी क्षेत्रांतील आणखी महत्वाच्या बातम्या पाहूयात लोकसत्ता ऑनलाइनच्या FB Live बुलेटीनमध्ये…