दिवसभरातील महत्वाच्या बातम्यापैकी पहिली बातमी आहे सीबीएसईच्या पेपरफुटी संदर्भातील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा पेपर देऊ नये असे वक्तव्य केले आहे. तर दुसरी महत्वाची बातमी संजय राऊत यांनी बेळगावमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्या संदर्भात आहे. लोकशाही मार्गाने न मिळाल्यास बेळगाव प्रश्न ठोकशाही मार्गाने सोडवण्याची भाषा राऊत यांनी केली आहे. तिसरी महत्वाची बातमी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेय यांच्या निधनाच्या अफवेसंदर्भातील आहे. त्याचप्रमाणे देश, राज्य, क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या जाणून घ्या लोकसत्ताच्या ऑनलाइन बुलेटीनमध्ये…