उत्तरप्रदेशात गुरूवारी मानवविरहीत रेल्वे क्रॉसिंगवर पॅसेंजर ट्रेनने शालेय विद्यार्थ्यांच्या बसला धडक दिल्याचा प्रकार घडला. मऊ जिल्ह्यात झालेल्या या अपघातात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य आठ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 21 शाळकरी मुले होती. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राणीपूर येथील मानवविरहीत रेल्वे क्रॉसिंगवरून एक बस डी.डी.कॉन्व्हेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. त्याचवेळी आझमगढहून वाराणसीच्या दिशेने जाणाऱ्या तामसा या पॅसेंजर ट्रेनने बसला धडक दिली. यावेळी बसमधील पाच मुलांचा जागीच जागीच मृत्यू झाला असून, अन्य आठ जण जखमी झाले. सध्या मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.