दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत. श्रीनगरजवळील पंथा चौक परिसरातील ही घटना आहे. आज संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास पंथा चौक परिसरात गस्तीवरुन परतणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी अंदाधुंदपणे गोळीबार केला. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी झालेले जवान हे 163 बटालियनचे आहेत, अशी माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्याने दिली.


 
दरम्यान, परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे , पण शोधमोहिम अद्यापही सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाची दोन वाहनं ड्युटीवरून परतत असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला, यामध्ये लष्कराचे 4 ते 5 जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.