राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कधीही आपल्या स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही, मात्र राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला जरुर देतं असं आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. आरएसएसकडून आयोजित ‘भविष्य का भारत’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत यांनी आरएसएस राज्यघटनेचा आदर करत असून, त्यानुसारच चालतं असंदेखील म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘आम्ही कधीही स्वयंसेवकांना एखाद्या विशिष्ट पक्षासाठी काम करण्यास सांगत नाही. मात्र राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देण्याचा सल्ला नक्की देतो. आरएसएस राजकारणापसून दूर राहतं, मात्र राष्ट्रहितावर त्यांची भूमिका असते’, असं मोहन भागवत बोलले आहेत.

‘आम्ही कधीही राज्यघटनेविरोधात जाऊन कोणतं काम केलेलं नाही. असं कोणतंच उदाहरण तुम्हाला सापडणार नाही’, असं मोहन भागवत यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी आरएसएस सरकारच्या कामकाजात दखल देत असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं की, ‘अनेक लोक अंदाज लावतात की नागपुरातून फोन जातात. मात्र हे साफ चुकीचं आहे’. मोहन भागवत यांनी नागपुरातून सरकार चालत नसल्याचं सांगत आरोप फेटाळले आहेत.

‘केंद्रात काम करणारे अनेकजण स्वयंसेवक आहेत. प्रधानमंत्री, राष्ट्रपती आरएसएसचे स्वयंसेवक राहिले आहेत. या मुद्द्यांवर अनेकदा चर्चा होत असते. खरंतर हे सगळे माझ्या वयाचे आहेत, मात्र राजकारणात मला सीनिअर आहेत. संघ कार्याचा मला जितका अनुभव आहे, त्याहून जास्त त्यांचा राजकारणाचा अनुभव आहे. त्यांना राजकीय वाटचालीसाठी कोणत्या सल्ल्याची गरज नाही. आम्ही तो देऊही शकत नाही’, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. सरकारच्या धोरणांवर संघाचा कोणताही प्रभाव नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government not controlled by rss says mohan bhagwat
First published on: 18-09-2018 at 19:57 IST