‘बिहार निवडणुकीनंतर पक्षात चेतना आली आहे. पण, अच्‍छे दिन यायला वेळ लागेल,’ असे प्रतिपादन भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी आज केले. गुजरातच्‍या अहमदाबादमध्‍ये स्‍थानिक निवडणुकीत मतदान करण्‍यासाठी ते आले होते. त्यानंतर अडवाणी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अच्‍छे दिन येतील. मात्र, त्‍यासाठी वेळ लागेल. यंत्रणेमध्ये बदल घडवण्यास वेळ लागतो यावर माझा विश्‍वास आहे. सरकार योग्य मार्गाने जात असून त्याचा परिणामही चांगला असेल यावरही माझा विश्‍वास आहे, असे म्हणत अडवाणींनी सरकारचे कौतुक केले. गुजरातमधील सहा महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरु आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळेल अशी खात्री असल्याचा विश्‍वासही अडवाणी यांनी यावेळी व्यक्त केला.