पाच जण ठार; सव्वा कोटी नागरिकांना तडाखा 

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात अभूतपूर्व अशा भीषण चक्रीवादळाने थैमान घातले आहे. प्रलयकारी पूर आणि मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले असून अशा भयानक वातावरणाने पाच जणांचे बळी घेतले आहेत. सुमारे १३ दशलक्ष लोक या परिस्थितीला तोंड देत आहेत.

us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
11 students dead in various incidents in us in 2024 mysterious deaths of Indian students in us
‘अमेरिकन ड्रीम’ दु:स्वप्न का ठरत आहे?
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!

हा अभूतपूर्व पाऊस बुधवापर्यंत ५० इंचांनी वाढेल असे भाकीत हवामानतज्ज्ञांनी केले आहे. ह्य़ूस्टन भागात मुसळधार पावसाचा पट्टा रात्रभरात कूच करण्याची अपेक्षा आहे. या भागात अनर्थकारी आणि जिवाला धोका उत्पन्न करणारी मुसळधार पाऊस व पुराची आणीबाणीची परिस्थिती कायम राहील असेही दिसते आहे.

एवढय़ा प्रचंड प्रमाणावरील पूर गेल्या ८०० वर्षांमध्ये प्रथमच आलेला असल्याचे फोर्ट बेंड काऊंटी जज रॉबर्ट हर्बर्ट यांनी सोमवारी एका निवेदनात सांगितले. गेल्या १३ वर्षांमधील सगळ्यात शक्तिशाली अशा ‘हार्वे’ चक्रीवादळाने अमेरिकेच्या मुख्य भूमीला तडाखा दिल्यानंतर आलेला हा पूर टेक्सास किनाऱ्यावर धडकल्यानंतर पाच जण ठार झाले आहेत.

२०० भारतीय विद्यार्थी अडकले

ह्य़ूस्टन/ नवी दिल्ली : टेक्सासला ‘हार्वे’ या चक्रीवादळाने तडाखा दिल्याने आलेल्या प्रलयंकारी पुरामुळे ह्य़ूस्टन विद्यापीठात अडकून पडलेल्या किमान २०० भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील भारतीय- अमेरिकी लोकांकडून या विद्यार्थ्यांना अन्न व इतर साहित्य पुरवण्यात येत आहे. ह्य़ूस्टनमधील भारताचे कॉन्सुल- जनरल अनुपम राय हे या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून त्यांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवून आहेत. शालिनी व निखिल भाटिया या २ भारतीय विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत सांगितले. ह्य़ूस्टन विद्यापीठातील सुमारे २०० भारतीय विद्यार्थी गळ्यापर्यंतच्या पाण्याने वेढले गेल्याचे कॉन्सुल जनरलने आपल्याला सांगितले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांच्यापर्यंत पोहचण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही स्वराज यांनी ट्विटरवर लिहिले.