येत्या ४८ तासात मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज मुंबईतला सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला, कारण आज मुंबईत पारा ४१ अंशावर होता. आज मुंबईतला सगळ्यात उष्ण दिवस नोंदवला गेला. याआधी २०११ मध्ये १७ मार्चला मुंबईचे तापमान ४१.३ अंशावर गेले होते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे तापमान ३३ किंवा ३४ अंशांवर आहे. मात्र आज हा पारा थेट ४१ वर पोहचल्याने मुंबईकरांना उन्हाच्या तीव्र झळा जाणवल्या. हवामान खात्याने पुढचे २४ ते ४८ तास असेच वातावरण राहिल असा अंदाज वर्तवला आहे. फक्त मुंबईतच नाही तर नाशिक आणि पुण्यातही उष्णतेची लाट जाणवेल असेही हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबईत २८ मार्च १९५६ या दिवशी उष्णतेचा पारा ४१.७ अंशांवर पोहचला होता. येत्या दोन दिवसात कदाचित हा रेकॉर्डही मोडू शकतो असे मत स्कायमेट व्हेदरचे व्हाइस प्रेसिडंट महेश पलावत यांनी नोंदवले आहे.

megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
traffic congestion will affect industries in metros in future says union minister rajeev chandrasekhar
पुण्यासह इतर महानगरांसाठी धोक्याची घंटा! केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांचा इशारा
police commissioner nagpur
चक्क पोलीस आयुक्तांनी पकडला कुख्यात गुंड

विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडलेलीच आहे अशात आता मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही शहरांमध्ये येत्या ४८ तासात उन्हाचा तडाखा बसणार आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान सध्या सर्वसाधारण आहे. उन्हाचे चटके अजून या भागांमध्ये बसायला सुरुवात झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये या भागातही उन्हाचे चटके जाणवू लागतील असेही स्कायमेटने म्हटले आहे.