गुजरात दंगलींवरून भारतीय जनता पक्षावर सातत्याने असूड ओढले जात असून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा हा पद्धतशीर कट आहे, असा आरोप करतानाच काँग्रेसच्या राजवटीत दंगली झाल्या नाहीत काय, असा सवाल भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शनिवारी मुस्लीम समाजाला केला.
 पक्षाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अल्पसंख्यक कार्यकर्त्यांतर्फे झालेल्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या राजकारणावर भाजपचा विश्वास नसून मुस्लीम समाजाने हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.