संसदेच्या अधिवेशनातील दुसऱ्या आठवडय़ाचे कामकाज तुलनेत शांततेत पार पडल्याने उल्हसित झालेल्या सरकारने मंगळवारपासून सुरू होत असलेल्या आठवडय़ाच्या कामकाजाची मोठी कार्यक्रमपत्रिका तयार केली आहे.

राज्यसभेत पहिल्या आठवडय़ाचे कामकाज जवळसपास वायाच गेले, दुसऱ्या आठवडय़ात वातावरण तुलनेत शांततेचे होते, रोहित वेमुला, जेएनयू प्रकरणावरून विरोधक आणि सत्तारूढ पक्षांत चांगलीच जुंपली होती.