"एप्रिल महिन्यात पूर्व लडाख सीमेवर चिनी सैनिकांची संख्या आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांच्या संख्येमध्ये वाढ दिसून आली. मे महिन्याच्या सुरुवातीपासून चीनने गलवान खोऱ्याच्या भागात आपल्या सैनिकांच्या गस्तीमध्ये अडथळे आणायला सुरुवात केली. ज्यामुळे समोरा-समोरच्या संघर्षाची स्थिती निर्माण झाली" असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. "चीनची ही कृती म्हणजे एकतर्फी जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हे मान्य नाही हे चीनला मुत्सद्दी तसेच लष्करी पातळीवरुन कळवण्यात आले" असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. आणखी वाचा- ‘संयम हवा तिथे संयम ठेवला, शौर्य हवे तिथे शौर्य दाखवलं’, राजनाथ सिंह यांची दहा महत्त्वाची विधानं इस सहमति के violation में चीन द्वारा एक violent face off की स्थिति 15 जून को गलवान में create की गई। हमारे बहादुर सिपाहियों ने अपनी जान का बलिदान दिया पर साथ ही चीनी पक्ष को भी भारी क्षति पहुचाई और अपनी सीमा की सुरक्षा में कामयाब रहे: रक्षा मंत्री — रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 15, 2020 "एलएसीवरील वाढता संघर्ष लक्षात घेऊन दोन्ही बाजूच्या सैन्य कमांडर्समध्ये सहा जून २०२० रोजी बैठक झाली. त्यामध्ये तणाव कमी करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय झाला. LAC मान्य करुन, जैसे थे परिस्थिती बदलेल असे काही करायचे नाही, यावर दोन्ही बाजू सहमत झाल्या" असे राजनाथ सिंह संसदेत म्हणाले. आणखी वाचा- लडाखमध्ये भारताची ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात – राजनाथ सिंह LAC पर friction बढ़ता हुआ देख कर दोनों तरफ के सैन्य कमांडरों ने 6 जून 2020 को मीटिंग की। इस बात पर सहमति बनी कि reciprocal actions के द्वारा disengagement किया जाए।दोनो पक्ष इस बात पर भी सहमत हुए कि LAC को माना जाएगा तथा कोई ऐसी कार्रवाई नहीं की जाएगी, जिससे status-quo बदले: RM — रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 15, 2020 "अशी सहमती होऊनही चीनकडून १५ जूनला गलवान खोऱ्यात हिंसक संघर्षाची स्थिती निर्माण केली गेली. आपल्या शूर जवानांनी प्राणांचे बलिदान दिले व चीनचेही मोठे नुकसान केले व भारताची सीमा सुरक्षित ठेवली" असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.