पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांकडून चार एके-४७, आठ मॅगझिन्स आणि २४० एके रायफल जप्त केल्या आहेत.
लष्कराला केरन सेक्टरमध्ये किशन गंगा नदी पात्रात काही हालचाली सुरु असल्याचं दिसलं होतं. यानंतर लगेचच जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून नदीपलीकडे नेत असल्याचं लक्षात आलं. यानंतर तात्काळ कारवाई करत शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
Troops detected movement on banks of Kishen Ganga River. Immediately, joint operation was launched with J&K Police. 2-3 terrorists were detected trying to transport some items in a tube tied to a rope from far bank of the river. Troops reached and recovered arms: Army Sources https://t.co/5vu2GeRFCU pic.twitter.com/l1YSS78Ecr
— ANI (@ANI) October 10, 2020
Indian Army deployed at the Keran Sector of North Kashmir yesterday thwarted an attempt by Pakistan Army-supported terrorists to smuggle weapons from PoJK. Four AK 74 rifles, eight magazines, 240 AK Rifle ammunition recovered: Indian Army Sources pic.twitter.com/slvmSOovJH
— ANI (@ANI) October 10, 2020
“यावर्षी मोठ्या प्रमाणात घुसखोरी रोखण्यात भारतीय लष्कराला यश मिळालं आहे. गेल्यावर्षी १३० वेळा प्रयत्न झाला होता, यावेळी ही संख्या ३० ने कमी झाली आहे. यामुळे देशांतर्गत परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल,” असा विश्वास लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी व्यक्त केला आहे.
आणखी वाचा- कुलगामध्ये जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Our alert troops, using surveillance devices, caught a cache of arms being smuggled by Pakistan. This shows that the intentions of Pakistan are the same. We will continue to fight back their ill intentions in future also: Lt. Gen B.S Raju, GOC Chinar Corps #JammuAndKashmir https://t.co/5vu2GeRFCU pic.twitter.com/2Ef890BNFJ
— ANI (@ANI) October 10, 2020
कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आमच्या सतर्क जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पाकिस्तानचा हेतू अद्यापही बदललेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत त्यांचा हेतू कायम आहे तोपर्यंत आम्ही लढा देत राहू,” असं ते म्हणाले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गुप्तचर यंत्रणांनुसार, पाकिस्तानमध्ये लॉँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी आहेत. वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करुनही त्यांना रोखण्यात आम्हाला यश आलं आहे”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 12:41 pm