जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. उरी सेक्टरमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या पाच दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. गुरुवारीदेखील जम्मू काश्मीरच्या कुपवाडातून दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा डाव हाणून पाडत त्यांचा खात्मा केला होता.