पाकिस्तानकडून सीमारेषेवर आगळीक सुरुच असून बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान जखमी झाले आहेत. भारतीय जवानांनीही पाकला चोख प्रत्युत्तर दिले.

सीमा रेषेवरील पूंछजवळ पाकिस्तानने रात्री दीडच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय चौक्यांवर पाककडून गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

दरम्यान, दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन अमेरिकेने खडे बोल सुनावले असतानाच सीमा रेषेवर पाकच्या कुरापती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. बुधवारी दुपारीदेखील पाकिस्तानने भिंबर गली येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. १ मेपासून पूंछ आणि राजौरी येथे पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.