२१व्या 'कारगिल विजय दिना'निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कारगिल युद्धात अतुलनिय शौर्य गाजवलेल्या सर्व जवानांच्या धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला आहे. तसेच कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचं प्रतिक असल्याचंही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे. शाह म्हणाले, "कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचं प्रतिक आहे. कारगिलच्या डोंगरांवरुन शत्रूला पिटाळून लावत तिथं पुन्हा तिरंगा फडकवणाऱ्या जवानांच्या धैर्याला मी अभिवादन करतो. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या नायकांचा देशाला अभिमान आहे." करगिल विजय दिवस भारत के स्वाभिमान, अद्भुत पराक्रम और दृढ़ नेतृत्व का प्रतीक है। मैं उन शूरवीरों को नमन करता हूँ, जिन्होंने अपने अदम्य साहस से करगिल की दुर्गम पहाड़ियों से दुश्मन को खदेड़ कर वहाँ पुनः तिरंगा लहराया। मातृभूमि की रक्षा के लिए समर्पित भारत के वीरों पर देश को गर्व है। pic.twitter.com/mD9Ged8Pkz — Amit Shah (@AmitShah) July 26, 2020 जवानांच्या शौर्याला सलाम - राजनाथ सिंह दुसरीकडे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील २१व्या कारगिल विजय दिनानिमित्त जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. त्यांनी म्हटलं, " संपूर्ण जगाला माहिती असलेल्या इतिहासातील काही काळापूर्वी घडलेल्या आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतील या युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो." On the 21st anniversary of Kargil Vijay, I would like to salute the brave soldiers of the Indian Armed Forces who fought the enemy under the most challenging conditions that the world had witnessed in the recent history. #CourageInKargil — Rajnath Singh (@rajnathsingh) July 26, 2020 Kargil Vijay Diwas is indeed the celebration of India’s proud tradition of outstanding Military service, exemplary valour and sacrifice. The unwavering courage and patriotism of our Armed Forces has ensured that India is safe and secure. — Rajnath Singh (@rajnathsingh) July 26, 2020 संपूर्ण देशभरात आज २१वा कारगिल विजय दिन साजरा होत आहे. अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना २६ जुलै १९९९ रोजी याच दिवशी भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारत कारगिल युद्ध जिंकलं होतं. पाकिस्तानने विपरीत हवामानाचा गैरफायदा घेत भारताची कारगिल पोस्ट ताब्यात घेतली होती. ही पोस्ट परत मिळवण्यासाठी ऑपरेशन विजयची योजना आखण्यात आली होती. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडत भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात आपलं सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आणि शौर्य गाजवणाऱ्या जवानांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिन साजरा केला जातो.