महाराष्ट्रात  झालेल्या राजकीय घडामोडींचा उल्लेख ‘फर्जिकल स्ट्राईक’ असा करून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

राज्यातील या घडामोडी संशयास्पद असून राज्यपालांनी नैतिक दृष्टीने राजीनामा दिला पाहिजे, असे गेहलोत म्हणाले. सत्तास्थापनेच्या अध्यायात राज्यपालांनी बजावलेली भूमिका ही दुर्दैवी आहे. राष्ट्रपती राजवट रद्द करून पुन्हा फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे म्हणजे  लोकशाही चुकीच्या मार्गावर नेल्यासारखे आहे, अशी टीका केली.