काश्मीरला विशेष तरतूद देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान व भारताचे संबंध आता आणखीनच ताणले गेले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सातत्याने भारताविरोधात आक्षेपार्ह विधाने करत आहेत. अलिकडेच त्यांनी जोपर्यंत भारत काश्मीरमधील नागरीकांवरील अन्याय थांबवत नाही तो पर्यंत पाकिस्तान भारताशी कुठल्याच प्रकारची चर्चा करणार नाही अशा आशयाचे ट्विट केले होते. या त्यांच्या ट्विटला कुमार विश्वास यांनी प्रतिक्रीया दिली आहे. प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी इम्रान खान यांना "कटोरा उचला व जगभरात भीक मागा" हा सल्ला दिला आहे. Ok @ImranKhanPTI So now Pick your Katora (Kasa) again and leave for a “World Bheekh Mangoo Tour” — Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) September 18, 2019 भारताबरोबर व्यापारी संबंध तोडल्यामुळे सध्या पाकिस्तानची आर्थिक स्थीती फारच बिकट झाली आहे. अगदी रोजच्या वापरातील दूध, भाज्या, अन्नधान्य यांचे भाव पाकिस्तानात गगनाला भिडले आहेत. तसेच सातत्याने सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांमुळे जगभरातून पाकिस्तानचा निषेध केला जात आहे. परिणामी पाकिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीला आता खिळ बसली आहे. अशा बिकट परिस्थीतीतही पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासारख्या सक्षम देशाला आव्हात देत असल्यामुळे कुमार विश्वास यांनी पाकिस्तानला भिक मागून उदरनिर्वाह करण्याचा सल्ला दिला आहे.