देशात करोनाने धुमाकूळ घातला आहे. देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ नवीन रुग्ण आढळले. पण दिलासादायक वृत्त म्हणजे सर्वाधीक रुग्ण बरे होऊण घरी गेले आहेत. ३ लाख ४४ हजार ७७६ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ४००० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात करोनाची लागण होण्याचे प्रमाण दोन कोटींच्या पुढे गेले आहे. तर करोनामुळे मृत्यूंचा आकडा २.६२ लाखांच्या वर पोहोचला आहे. India reports 3,43,144 new #COVID19 cases, 3,44,776 discharges and 4,000 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry Total cases: 2,40,46,809 Total discharges: 2,00,79,599 Death toll: 2,62,317 Active cases: 37,04,893 Total vaccination: 17,92,98,584 pic.twitter.com/rLz1Fvz1Oa — ANI (@ANI) May 14, 2021 आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या २४ तासांत ३,४४,७७६ लोक या विषाणूचा पराभव करण्यात यशस्वी झाले आहेत. तर आतापर्यंत दोन कोटीपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाल्याचे चित्र आहे. सध्या देशात ३७,०४,८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात पॉझिटीव्हीटी रेट १८.२९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत १८.७५ लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, आतापर्यंत १७,९२,९८,५८४ नागरीकांना करोना लसीचा डोस देण्यात आल्या आहे.