संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ पहायला मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील नव्या सदस्यांची ओळख करुन देण्यासाठी उभे राहिला असता विरोधकांनी गोंधळ घातला. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांच्या गदारोळावर ओम बिर्ला यांनी यावेळी संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गदारोळ विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावलं. ओम बिर्ला निधन झालेल्या नेत्यांसाठी शोक प्रस्ताव मांडत असतानाही विरोधक गदारोळ घालत असल्याने ते संतापले. मोदींची विरोधकांवर टीका “मला वाटलं होतं की, इतक्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्याने संसदेत उत्साह असेल. यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाही आहेत,” असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण ‘बाहू’बली बनतो – नरेंद्र मोदी विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावलं. I thought that there would be enthusiasm in the Parliament as so many women, Dalits, tribals have become Ministers. This time our colleagues from agricultural & rural background, OBC community, have been given berth in Council of Ministers: PM introduces his new Ministers, in LS pic.twitter.com/Hf7JIbhFFB — ANI (@ANI) July 19, 2021 "लस घेऊन बाहुबली व्हा" दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशन सुरु होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. करोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यावेळी त्यांनी लस घेताच करोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो असं सांगत लस घेण्याचं आवाहन केलं. Monsoon session of Parliament : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून “मी आशा करत आहे की तुम्ही सगळ्यांनी लसीचा कमीत कमी एक डोस घेतला असेल. तरीही तुम्ही करोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करा. लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. करोनाविरुद्धच्या लढाईत जर तुम्हाला बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोकं करोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल,” असे मोदींनी म्हटलं. I have urged all Floor Leaders that if they can take out some time tomorrow evening then I would like to give them all detailed information regarding the pandemic. We want discussion inside the Parliament as well with the Floor Leaders outside the Parliament: PM Modi#COVID19 pic.twitter.com/rJ5tul3j9c — ANI (@ANI) July 19, 2021 “तिखट आणि धारदार प्रश्न विचारा, पण….,” मोदींचं विरोधकांना आवाहन < येथे वाचा सविस्तर वृत्त #MonsoonSession2021 #MonsoonSession #PMModi @narendramodi @BJP4India pic.twitter.com/hcyVLGPXSM — LoksattaLive (@LoksattaLive) July 19, 2021 “संसदेत चर्चा व्हायला हवी” “करोनाने सर्व जगावर आणि मानवजातीवर प्रभाव पडला आहे. त्यामुळे या महामारीवर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि या मुद्यावर प्राथमिकपणे चर्चा करायला हवी. तसेच सर्व सदस्यांकडून यावरील सूचना सूचना मिळाव्यात, जेणेकरून कोविडविरूद्ध लढा देण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल आणि उणीवा दूर होऊन एकत्रित वाटचाल करु. मी सर्व खासदारांना आणि सर्व पक्षांना सभागृहात अत्यंत कठीण आणि तीव्र प्रश्न उपस्थित करण्याची विनंती करतो. पण त्याचसोबत उत्तर देण्यासाठी सरकारला शिस्तबद्ध वातावरणात वेळ द्यावा. यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल” असे मोदी यांनी म्हटलं.