अण्णा हजारे यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच लोकपाल विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाली असून हे अण्णांचे यश असल्याचे  भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी म्हटले. अण्णा हजारे यांनी दिलेल्या लढय़ामुळे लोकपाल विधेयक अस्तित्वात येणार आहे. हजारे यांना उत्तम आरोग्य लाभो, अशी प्रार्थना करीत असल्याचे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.  याशिवाय लोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या प्रक्रियेत भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही मोदी यांनी ट्विटरवर नमूद केले आहे.