मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी बंगालच्या कलाइकुंडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चक्रीवादळ यासमुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केला. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मोदींनी घेतलेल्या आढावा बैठकीत सहभाग घेण्यासाठी टाळाटाळ केल्याने ममतांवर त्यांनी टीका केली आहे. अहवाल दिल्यानंतर ममता बैठकीतून निघून गेल्या.

यास चक्रीवादळा दरम्यान झालेल्या नुकसानभरपाई साठी मोदींनी मदत कार्यांसाठी १००० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यापैकी ५०० कोटी रुपये त्वरित ओडिशाला वितरित केले जातील. उर्वरित ५०० कोटी हे पश्चिम बंगाल आणि झारखंडसाठी झालेल्या नुकसानाचीच्या आधारे जाहीर केले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर केल्यानंतर ममता बॅनर्जी या सभेतून निघून गेल्या. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान “तुम्ही मला भेटायला खूप दूर आलात … म्हणून मी तुम्हाला भेटायला आले” असे म्हटले.

“तुम्ही मला भेटायला फार दूर आलात. तुम्हाला मला भेटायचे होते, म्हणून मी आलो. माझे मुख्य सचिव आणि मी, आम्ही तुम्हाला हा अहवाल सादर करीत आहोत. आता मला माझ्या वेळापत्रकानुसार दिघा येथे जावे लागेल. मी रजा घेत आहे,” असे बॅनर्जी यांनी दीघा येथे पत्रकारांशी बोलताना  सांगितले.

ममतांनी बैठकीत सहभागी होण्यास टाळाटाळ केल्याबद्दल धनखड यांनी टीका केली. आणि म्हटले की ते “घटनात्मकता किंवा कायद्याच्या राज्याशी सुसंगत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या आढावा बैठकीला हजेरी लावली असती तर राज्य आणि लोकांचे हित झाले असते असेही धनखड म्हणाले.