पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी 'मन की बात'मधून संवाद साधला. देशासमोर उभ्या असलेल्या करोना संकटापासून ते योग दिनापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केलं. देशानं करोनाविरोधात एकजुटीनं लढा दिला आहे. आता लॉकडाउन शिथिल होत असून आता अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.