केंद्र सरकारला सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सरकारचा मानस असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा केली. मोदी मंगळवारी रात्री तीन देशांच्या दौऱ्यावरून मायदेशी परतले व त्यांनी अरुण जेटली, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही याबाबत मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारने गेल्या एक वर्षांत केलेली कामे सामाजिक क्षेत्रातील कामे जनतेपर्यंत संदेशाद्वारे पोहोचविण्याच्या सूचना मोदी यांनी केली.