संसदेचं पावसाळी अधिवेशन लवकर संपवलं जाण्याची शक्यता आहे. कारण पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून ३० खासदारांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रल्हाद पटेल यांचाही समावेश आहे. त्यामुळेच हे अधिवेशन लवकर संपवलं जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष घेतील, त्यांनी निर्णय घेतल्यानंतरच याबाबतची नक्की तारीख समजू शकणार आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.