मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ईश्वरदास रोहनी (वय ६७) यांचे हृदयविकाराने निधन झाले. जबलपूर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सलग चार वेळा ते निवडून आले होते. २५ नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पुन्हा त्यांना उमेदवारी दिली होती. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. आणीबाणीच्या काळात १९ महिने ते तुरुंगात होते. १९९८ मध्ये ते विधानसभेचे ते उपाध्यक्ष होते. २००३ मध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष झाले.