केंद्र सरकारनं पारित केलेल्या तीन कृषी विधेयकांवरून गेल्या सहा ते सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि सरकारमध्ये बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र तरीही आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. सरकारने कृषी कायदे मंजूर केल्यानंतर विरोध करत शिरोमणी अकाली दल भाजपासोबत युतीतून बाहेर पडला. तर खासदार आणि अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी हरसिमरत कौर आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांची संसदेबाहेर भेट झाली. यावेळी हरसिमरत कौर यांनी हेमा मालिनींना गव्हाची ओंबी भेट देऊ केली आणि त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगितलं. हेमा मालिनी संसदेत प्रवेश करत असताना हरसिमरत कौर त्यांना गव्हांची ओंबी सोपवली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यास सांगितलं. कौर यांनी हातातील फलक उलटे करून हेमा मालिनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा दावा केला. त्यानंतर हेमा मालिनी हसल्या व संसदेत निघून गेल्या. #WATCH | Shiromani Akali Dal MP Harsimrat Kaur Badal offers wheat stalk to BJP MP Hema Malini, as SAD-BSP continue to protest at Parliament over Centre's farm laws pic.twitter.com/TnBlGHPjlw — ANI (@ANI) August 3, 2021 दरम्यान, सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून यावेळी सरकारला कोडींत पकडण्यासाठी विरोधकांकडून व्यूहरचना आखली जात आहे. पेगॅसस प्रकरणावरुन संसदेत गदारोळ घालत सरकारला जाब विचारणारे विरोधक एकवटले असून यावेळी पुढील रणनीती आखण्यात आली असं बोललं जात आहे. एकीकडे पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत.