माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणी वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत असणारी नलिनी श्रीहरन हिची एका दिवसाच्या पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. नलिनीच्या वडिलांचे निधन झाले असल्याने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करता यावेत यासाठी तिला एक दिवसाचा पॅरोल देण्यात आला. बुधवारी सकाळी नलिनी वेल्लोर कारागृहातून चेन्नईसाठी रवाना झाली. तिच्यासोबत दहा पोलीस कर्मचारी देखील आहेत. वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर तिला पुन्हा कारागृहात परत आणले जाणार आहे.
दरम्यान, नलिनी हिच्यासह अन्य सहा आरोपी तमिळनाडूळच्या वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. या आरोपींना २८ जानेवारी १९९८ रोजी न्यायालयाने दोषी ठरविले होते. दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

nagpur woman filed rape charges against future husband
तरुणीची भावी पतीविरुद्ध बलात्काराची तक्रार…साक्षगंध होताच……
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा