मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर धरण प्रकल्पात जमीनीच्या बदल्यात जमीन देण्याचे आश्वासन मुंख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहे. गेले सोळा दिवस जल सत्याग्रह करणा-या गावक-यांची मागणीला अतिशय गंभीररित्या घेऊन धरणातील पाण्याची पातळी १८९ मीटर खाली घेण्याचेही चौहान यांनी जाहीर केले आहे.
चौहान यांनी आज सकाळी भाजप आमदार लोकेंद्र सिंह तौमर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या विस्थापितांच्या एका मंडळासोबत चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, सरकार ने जमीनीच्या बदल्यात जमीन आणि धरणातील पाण्याची पातळी १८९ मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सरकारद्वारे वर्ष २००८ साली विस्थापितांच्या विशेष अनुदानाची रक्कम सरळ त्यांच्या बॅंकेच्या खात्याय जमा करण्यात आली होती. त्यांनी सांगितले की, जमीनीचा लाभ त्यांनाच मिळेल जे ९० दिवसामध्ये त्यांना मिळालेल्या विशेष अनुदानाची रक्कम परत करतील. या विस्थापितांना सरकारी भूमी बॅंकेच्या माध्यमातून जमीन उपलब्ध करून देण्यात येईल.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?