पाकिस्तानशी चर्चा करण्याची भारताची इच्छा आहे असा संदेश भारताने पाठविल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने केला. त्याचे भारताने गुरुवारी जोरदार खंडन केले.

अशा प्रकारचा कोणताही संदेश भारताने पाठविलेला नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

इम्रान खान यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी वरील दावा एका वृत्त संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केला होता त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीवास्तव यांनी त्याचे खंडन केले.