भाजप कधीही सुडाचे राजकारण करीत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या जमीन व्यवहार प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश हरयाणा सरकारने दिले आहेत त्या पाश्र्वभूमीवर गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे.
आम्ही कधीही सुडाचे राजकारण करीत नाही, असे आपण देशवासीयांना आश्वस्त करतो, आम्हाला सर्वाना बरोबर घेऊन पुढे जावयाचे आहे, प्रत्येकाचा विकास करावयाचा आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.