केंद्रातील सरकार अस्थिर करण्याच्या आणि आपली बदनामी करण्याचा कट रचला जात असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याची विरोधकांनी खिल्ली उडविली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारवर जोरदार हल्ला होणार हे निश्चित असल्याने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी वरील वक्तव्य केले असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे. देशात विविध विषयांवर आंदोलने होत असताना पंतप्रधान गप्प का होते, असा सवालही करण्यात येत आहे.